Monday, December 29, 2014

;;; झाली संध्याकाळ ;;;


झाली संध्याकाळ म्हणावी कि नभ दाटून आले ?
मरणोन्मुख या जगण्याला हे उगीच वाटून गेले. 

या जन्माला उमलायाचे, बहरायाचे होते,
नुकते कोठे आयुष्याला शोधायाचे होते,
आताशा तर स्वप्नांना आली पंखांची जोडी,
आता कोठे डोळ्यांना कळली जगण्याची गोडी. 
तिथे अनाहूत कशास हे यमराजच पाठून आले ? 
मरणोन्मुख या जगण्याला हे उगीच वाटून गेले. 

झाली संध्याकाळ नसावी तरी उगवला तारा,
अप्रूप वाटे अंतरातूनी वाहत नव्हता वारा, 
दिशेस त्या जाताना होता केवळ मंद प्रकाश,
अशी शांतता कधीच नव्हती, नवीन धुंद प्रवास,
नवजन्माची सफर असावी भासच चाटून गेले. 
मरणोत्तरहि जगण्याला हे उगीच वाटून गेले. 

- अतुल राणे.

No comments:

Post a Comment