तुझ्या त्या क्षणांना पुन्हा पावसाने नभातून आणून सांडायचे ,
हि तू कि तुझ्या आठवांचा सडा हा, पुन्हा मी मनाशीच भांडायचे ,
कुठे या सरींपासुनी दूर नेऊन आजन्म देहास कोंडायचे ,
तिथेही तुझ्या आठवांच्या विजांनी निनादून थैमान मांडायचे .....!
;;;;;;;;; अतुल राणे ;;;;;;;;;
चार वाक्यात बरच काही..सुंदर काव्य!
ReplyDelete